महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – अमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते पदार्थ जवळ बाळगण्याची मर्यादा देखील कमी करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Today's discussion in Maharashtra Legislative Assembly on anti-narcotic measures, policy changes, efforts !
अंमली पदार्थांचा धोका मोठा आहे.
वेगवेगळ्या अॅप्स आणि तंत्रांचा वापर केला जातो आहे.
केंद्र आणि विविध राज्य सरकारांची एक संयुक्त बैठक झाली. जिल्हा पातळीवर एक समिती गठीत… pic.twitter.com/cting7QWHh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 18, 2023
फडणवीस म्हणाले अमली पदार्थाच्या व्यापार आणि प्रसाराचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. दहशतवाद विरोधी पथकाला समन्वय एजन्सी म्हणून नेमले आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर अमली पदार्थविरोधी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात विदेशी नागरिकांच्या माध्यमातून अमली पदार्थ आणले जात आहेत. त्यावर नियंत्रणासाठी राज्यात असलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत तपासणी, व्हिसा संपल्यानंतर देखील येथे राहणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे. ज्या नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत डिटेन्शन सेंटर सुरू करत आहोत.
याशिवाय केंद्र सरकार देखील या विरोधात कडक पावले उचलत आहे. तस्करांनी आता कंटेनर कार्गोच्या माध्यमातून ड्रग पाठविण्यास सुरुवात केली असल्याने त्याच्या शोधासाठी विशेष स्कॅनर खरेदी केले जात आहे. कुरियर आणि पोस्टाच्या माध्यमातून होणारे वाहतूक रोखण्यासाठी कुरिअर एजन्सी आणि पोस्टाला सूचना देण्यात आल्या आहेत. या दृष्टीने केंद्र सरकारचे देखील मदत घेतली जात असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत अनिल देशमुख, नितेश राणे, अबू आझमी, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, महेश शिंदे, कैलास गोरंट्याल आदी आमदारांनी सहभाग घेतला.

