महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बहुजन समाजामधील प्रतिभावान व कर्तबगार ठरलेल्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहिर अमर शेख यांना भारतरत्न पुरस्कार गौरव करण्याची मागणी असिफ शेख यांनी केली आहे.
यांना दिले निवेदन: प्रांताधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्काराची मागणी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिर अमर शेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप महान असे कार्य करून ठेवले. ते लोक चळवळीतील कार्यकर्ते असल्याने निरपेक्ष वृत्तीने काम केले आहे. त्यांनी कधीच पुरस्कार, मानधन व पदांसाठी कधीच काम केले नाही. त्यांनी सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे.
का केली मागणी: साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. इतके कार्य एखाद्या प्रस्थापित समाजातील नेत्याने केले असते तर त्याला केव्हाच हा पुरस्कार प्रदान केला असता. परंतू अण्णाभाऊ व अमर शेख यांनी साहित्यातुन आपले परखडपणे मत मांडले होते म्हणून कदाचित त्यांच्या पुरस्कारासाठी राजकारण आडवे आले आहे. जे काम त्यांच्या हयातीत व्हायला पाहिजे हवे होते, ते किमान आपल्या सरकारने मरणोत्तर तरी करून एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करावा. म्हणून आपण त्यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांची भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस व पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती: प्रांत अधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसिलदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक अब्दुल्हा चौधरी, कारभारी देव्हारे, राजुभाई इनामदार, अनिल खर्डे, ज्ञानेश्वर राक्षे, एजाज बिल्डर, आसिफ शेख, जानकीराम भडकवाड, इरफान फिटर, राजु थोरात आदी उपस्थित होते.

