Author: अनंत पांगारकर
गुरुवार, २६ सप्टेंबर मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वकील विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली. संजय राऊत यांनी डॉ. मेधा सोमय्या आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. हा आरोप खोटा असल्याचा दावा करत मेधा सोमय्या यांनी माजगावच्या न्यायालयात संजय राऊत यांच्यावर १०० करोड रुपये अब्रुनुकसानीचा दावा केला होता. काय होता आरोप? मीरा भाईंदरमध्ये शौचालय बांधकामात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनीच…
प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही केली ठेकेदाराची कान उघाडणी, तरीही पडेना फरक संगमनेर – अनंत पांगारकर नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे सध्या महत्त्वाच्या ठिकाणी साईड रस्ते आणि साईड गटारी काढण्यात येत असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप हिवरगाव पठार भागातील नागरिकांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे व दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कामाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. साईड गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात…
असा आहे तुमचा आजचा दिवस मेष – एखाद्या मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मनात चढ-उतार असतील. आत्मविश्वासाची कमतरता देखील असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. वृषभ – अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. मनात शांती आणि आनंद राहील. मिथुन – शैक्षणिक कार्यात रस राहील. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. तीर्थयात्रेला जाता येईल. कर्क – लोकांशी बोलताना संयम बाळगा. मन अस्वस्थ होऊ शकते. अनावश्यक राग आणि वादविवादापासून दूर राहा. सरकारकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. सिंह – वाणीच्या प्रभावामुळे सर्व कामे पूर्ण होतील. कपडे वगैरे भेटवस्तू म्हणून…
विशेष लेख राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा १ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची पात्रता… योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या…
बुधवार, २५ सप्टेंबर अहमदनगर – नगर जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने खाकी वर्दीचा धाक दाखवत आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदे येथील व्यक्तीने केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा या महिलेच्या पीडित पतीने दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. २७ सप्टेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित पती मुलांसह उपोषणास बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने पीडित महिलेच्या पतीवर ही दुर्दैवी वेळ ओढविली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत…
बुधवार, २५ सप्टेंबर पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड दाबून फरफटत नेत २३ वर्षीय नराधमाने केलेल्या बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. २३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. पीडित वृद्धेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपी ओम जयचंद पुरी (वय वर्षे २३, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा.…
बुधवार, २५ सप्टेंबर नाशिक – अपील आदेशाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र भागवत केदारे (वय ५७) लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ते कार्यरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाची पत्नी महिला बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना नाशिकच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून या अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला होता. या अपीलाच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी राजेंद्र केदारे यांनी पंधरा…
बुधवार, दि. २५ सप्टेंबर २०२४ मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. नफ्याचे नियोजन करण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल, परंतु जर तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात वापरली तरच ते चांगले होईल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढेल. मित्रांसोबत कुठेतरी जाऊ शकता. जर तुमच्या वडिलांनी कामाबाबत काही सल्ला दिला तर तुम्ही त्यांचे म्हणणे पाळले पाहिजे. पुरस्कार प्राप्त केल्याने पार्टी आयोजित केली जाऊ शकते. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाने भरलेला असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांचे अधिकारी त्यांच्या कामावर खुश राहतील, त्यामुळे त्यांना प्रमोशनही मिळू शकते. जर…
भगूरमध्ये साकारणार सावरकरांच्या जीवनावर आधारित थीमपार्क पंढरपुरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे…
मंगळवार, २४ सप्टेंबर अहमदनगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
