Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भास्कर देवराव तनपुरे (वय ५०, व्यावसायिक शेतकरी) आणि सार्थक गणेश निमसे (वय १६, इयत्ता दहावीचा विद्यार्थी) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही मृतांना धार्मिक कार्याची प्रचंड आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार, जुने भालगाव येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दर सोमवारी कीर्तन व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. सोमवारी या धार्मिक कार्यक्रमाच्या स्वयंपाकात आणि तयारीत दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघे नदीत पोहण्यासाठी गेले, मात्र ते घरी परतलेच नाहीत. ते कीर्तनासाठी थांबले असावेत असे वाटल्याने रात्रीपर्यंत कोणाच्या लक्षात आले नाही.…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील आणि जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी जपून राहावे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यवसायात नवीन फायदेशीर करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली असताना, संगमनेर तालुक्यात मात्र याचे साधे पडसादही उमटलेले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवाईचा दणका सुरू असताना, संगमनेरच्या अन्न व औषध प्रशासनाला नेमकी कोणती ग्लानी आली आहे, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. संगमनेरमधील या संशयास्पद शांततेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, येथील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमर कतारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संगमनेरमधील विदारक स्थितीवर थेट बोट ठेवले आहे. संगमनेरमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजनेची सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी ८६०५३२११६७ या संपर्क क्रमांकावर संवाद साधावा, असे यशोधन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नियोजनातून तालुक्यातील नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालय सातत्याने कार्यरत असते. या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून आजवर अनेक ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात आला असून,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: संगमनेर न्यायालय परिसरात एका अटक आरोपीच्या समर्थनार्थ बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस काँस्टेबल चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (८ जून) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी शिवार येथील संगमनेर न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी पोलीस अधिकारी हे एका आरोपीला न्यायालयात हजर करत असताना, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी अटक आरोपीचे व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी न्यायालय परिसरातच गैरकायदेशीर घोळका तयार करून गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता, आरोपीला न्यायालयाबाहेर आणले जात असताना या जमावाने “आयेगा तो अपना राज,…

Read More

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना प्रतिवर्ष मिळणाऱ्या ९ सिलिंडरऐवजी केवळ ४ सिलिंडरच अनुदानित दराने मिळतील. या चार सिलिंडरसाठी लाभार्थ्यांना ६४२ रुपये मोजावे लागणार असून, त्यापुढील उर्वरित सिलिंडर खरेदीसाठी त्यांना अधिकची बाजारभावाप्रमाणे रक्कम द्यावी लागणार आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमालीचे भडकले असून गॅस सिलिंडरच्या अनुदानावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढता खर्च आणि तोटा लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातच…

Read More

‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी! संपादकीय:- जागतिक घडामोडींचे कारण पुढे करत केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत ९ वरून थेट ४ वर कपात केली आहे. आधीच महागाईच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य आणि गरीब कुटुंबांच्या जखमेवर हा निर्णय म्हणजे मीठ चोळण्यासारखाच आहे. निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देणाऱ्या सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या घरातली शेगडी पेटणार कशी, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये झाली, तेव्हा वर्षाला १२ अनुदानित सिलिंडर दिले जात होते. गेल्या वर्षी हा कोटा ९ वर आणला गेला आणि आता तो थेट ४ वर…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: ​आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे गती घेतील. आर्थिक आघाडीवर धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. ​वृषभ: ​आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे, परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे संपन्न झालेल्या ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट २०२६’ मध्ये बँकेला देश पातळीवरील सर्वोच्च ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. या मुख्य पुरस्कारासोबतच बँकेला इतर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना ‘बेस्ट चेअरमन’, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना ‘बेस्ट सीईओ’ आणि बँकेने सातत्याने राखलेल्या शून्य टक्के नेट एनपीएबद्दल ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अकोले व संगमनेर परिसरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड आणि महाकाय वटवृक्ष या ठिकाणी तिसऱ्या अभ्यास सहलीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. सकाळी संगमनेर बसस्थानकातून या अभ्यास सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते…

Read More