महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमध्ये आता टोमॅटो पाठोपाठ कांदाही वधारला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून प्रतिक्विंटल 2600 रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असे मिळाले कांद्याला भाव: मंगळवारी (ता. 7 ऑगस्ट) झालेल्या कांदा लिलावामध्ये बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2000 ते 2600 रुपयांचा भाव मिळाला. त्या पाठोपाठ दोन नंबर कांद्याला 1200 ते 1800 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला.
असा मिळाला टोमॅटोला बाजार: याशिवाय बाजार समितीत टोमँटोला 1000 ते 2500 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला बाजार भाव मिळत आहे.
डाळिंबाची झाली मोठी आवक: कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंबाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. एक नंबर डाळिंबाला प्रति किलो 151 ते 200 रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास 100 ते 141 रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास 75 ते 95 रुपये प्रति किलो, व चार नंबर डाळिंबास 20 ते 45 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला.
आवाहन: उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कांदा, डाळींब, टोमँटो तसेच इतर शेतमाल संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले आहे.

