महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – लोकशाही प्रणालीमध्ये मतदान हा अत्यंत पवित्र व महत्त्वाचा अधिकार असून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व युवक व युवतींनी 8055987777 या नंबरवर मिस कॉल देऊन नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली. लोकशाही व राज्यघटनेमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी प्रत्येक युवकाला मतदान करण्याचा पवित्र अधिकार मिळाला आहे. लोकशाही व राज्यघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपली मतदार नोंदणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
काय कराल: याकरता यशोधन कार्यालयाच्यावतीने मतदार नोंदणीमध्ये तरुणांसाठी सहजता यावी, याकरता 8055987777 या नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक लिंक प्राप्त होईल. त्या लिंकवर आपली प्राथमिक माहिती भरून द्यायची आहे.
जनसेवक आपल्याला भेटेल: ही माहिती भरून झाल्यानंतर यशोधन कार्यालयातील जनसेवक आपल्याकडे येऊन आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स घेऊन ते शासकीय कार्यालयात किंवा मतदार नोंदणी अधिकारी जमा करतील. यामुळे आपली नवीन मतदार नोंदणी सहज करता येईल.
युवक युवतींचा मिळतोय प्रतिसाद: आतापर्यंत या अभियानाला तालुक्यातील तरुण व तरुणींनी मोठा प्रतिसाद दिला आहे. अजूनही जे युवक व युवती, नवविवाहिता यांची किंवा आपल्या परिवारातील कुणाची मतदार नोंदणी करण्याची बाकी असतील त्यांनी वरील क्रमांकावर मिस कॉल देऊन तातडीने आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

