महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे वाढला आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून मंगळवारी (5 सप्टेंबर) उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला 2200 ते 2601 रुपयांचा भाव मिळाला.
असे होते बाजारभाव: मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात दोन नंबर कांद्याला 1700 ते 2000 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपये तसेच गोल्टी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला आहे.
टोमॅटो डाळिंबालाही उच्चदर: बाजार समितीत टोमॅटोला पन्नास ते दीडशे रुपये पर्यंत भाव मिळाला असून डाळिंबाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. एक नंबर डाळिंबास प्रति किलो 251 ते 375 रुपयांचा, दोन नंबर डाळिंबास प्रति किलो 151 ते 200 रुपयांचा, तीन नंबर डाळिंबास 75 ते 111 रुपयांचा व चार नंबर डाळिंबास 20 ते 70 रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
आवाहन: शेतकऱ्यांनी कांदा, डाळिंब, टोमॅटोसह आपला इतर शेतमाल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले आहे.

