Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज! सावळीविहीरमध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा
राजकारण

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज! सावळीविहीरमध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा

जनसंवाद यात्रेला सावळीविहीरकरांचा प्रतिसाद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 14, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – सध्या देश एका वेगळ्या संक्रमणातून जात असून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेली देशाची वाटचाल लोकशाहीसाठी धोकादायक असल्याने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे आवाहन काँग्रेसच्या सचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी केले.

जनसंवाद यात्रेस यांची उपस्थिती: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, तालुका निरीक्षक सचिन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, ज्येष्ठ नेते मामा पगारे, सावळीविहीरचे काँग्रेस अध्यक्ष साहिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सावळीविहीर गावामध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांसह गावकरी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, ॲड. अविनाश शेजवळ, सिमोन जगताप, राहत्याचे अध्यक्ष नितीन सदाफळ, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई पारधे, अविनाश दंडवते, अशोक आगलावे उपस्थित होते.

रुपवते म्हणाल्या, सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. 2014 नंतर राज्यात महागाईने उच्चांक गाठला असून त्या अगोदर स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल डिझेल आणि अन्नधान्याच्या किमती काय होत्या. देश एका वेगळ्या वाटेने जात आहे. मणिपूरच्या घटनेकडे बघायला सरकारला वेळ नाही. शिर्डीच्या देवस्थानात अडीचशे कोटी रुपये खर्च करून दर्शन रांग बांधली मात्र ती अजून सुरू का होत नाही असे प्रश्न उपस्थित करत देशात व राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची गरज असल्याचे सांगितले.

पंकज लोंढे म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील प्रत्येक गावात काँग्रेसचे जनसंवाद यात्रा काढली जाणार असून या यात्रेच्या माध्यमातून गावागावात काँग्रेसचा विचार पोहोचविणार आहोत. सद्यस्थितीत देशाचे लोकशाही धोक्यात आली असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी हे चित्र बदलण्याची गरज आहे.

साहिल म्हस्के म्हणाले, सर्वसामान्य माणूस लोकशाही वाचवण्यासाठी जागृत झाला नाहीतर या देशात हुकूमशाही येईल व सर्वसामान्य जनतेला ते कधीही परवडणारे नाही. लोकांची चळवळ अन विचार म्हणचे काँग्रेस अन ती टिकली पाहिजे. सचिन गुजर, मामा पगारे यांचीही यावेळी भाषणे झाली.

हे होते उपस्थित: यावेळी संजय पगारे, मुन्ना फिटर, अमोल आरणे, अनिस शेख, उत्तमराव मते, संजय जेजुरकर, रमेश गागरे, सुरेश आरणे, बाबासाहेब काळे, सतीश काळे, किशोर गाडेकर, बबनराव नळे, अमोल बनसोडे, संदीप कोकाटे, प्रवीण घोडेकर, मच्छिंद्र गुंजाळ, अभिषेक वाघमारे, अशोक पारधे, चंद्रशेखर कार्ले, अण्णासाहेब मेचे, राजेंद्र निर्मळ, प्रसाद आहेर, अनिस सरोदे, राज लांडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 501
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.