महाराष्ट्र संवाद न्यूज
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम विमानतळावर जात असताना सीपीआय(एम) ची विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या काही लोकांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. यावरून आपल्याला मारण्यासाठी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुंड पाठविल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे. यामुळे केरळमध्ये राजकीय गोंधळ वाढला आहे.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यातील संघर्ष देखील वाढला आहे. अपघातानंतर कारमधून लगेचच बाहेर आलेल्या राज्यपालांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. आपल्याला शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक वैयक्तिक लक्ष्य करून केलेले कृत्य आहे. तिरुअनंतपूरमच्या रस्त्यांवर ‘गुंडांनी’ कब्जा केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

आपल्या वाहनावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतप्त झाले. त्यांनी या घटनेचा आणि केरळमधील लोकशाहीच्या ढासळलेल्या स्थितीचा निषेध केला. राजकीय मतभेदामुळे शारीरिक हिंसा होऊ नये यावर त्यांनी भर हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचे म्हटले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी केवळ झेंडेच फडकवले नाहीत, तर त्यांच्या वाहनावर दोन्ही बाजूंनी हल्ला केल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

