महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील ५८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नाही.

याशिवाय श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचीदेखील छत्रपती संभाजी नगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर येथून वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाण्याचे पोलीस सह आयुक्त असलेले व नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती झालेले दत्तात्रेय कराळे यांनी काही काळ संगमनेरमध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून देखील काम केले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा त्यांना चांगला परिचित आहे.
नव्याने बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस महासंचालक रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक अमितेश कुमार, प्रभात कुमार, रवींद्र कुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बदल्या झालेले अधिकारी आणि त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणे खालील प्रमाणे…








