रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका…
काँग्रेसने अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप काही दिले मात्र आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की ज्यामुळे चव्हाण यांना काँग्रेसच सोडावी लागली? चव्हाण यांच्यावर काही दबाव होता का? असा सवाल उपस्थित करत ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असावेत, अशी थेट सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेसच्या पडझडीवर विचार मंथन करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी थोरात बोलत होते.
- चव्हाण स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले…
थोरात म्हणाले चव्हाण यांचा तिकडे जाण्याचा टाइमिंग बघितला तर दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार व अश्रूधूर सुरू असताना ते भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण आणि त्यांच्या वडिलांना काँग्रेसने खूप काही दिले. अनेक संधी दिल्या. आता ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असल्याचे ते म्हणाले.
- रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका…
काँग्रेसने अशोक चव्हाण यांना सर्व काही दिले तरीदेखील त्यांनी पक्ष का सोडला यामागील कारण त्यांनी स्पष्ट करावे असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. तर नांदेड मधील काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस सोबत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


