महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या अत्याचारी कारवाईचा आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर आलेल्या गदेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी संगमनेर येथे आज, बुधवारी (दिनांक २२ जुलै) सायंकाळी सहा वाजता भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा ‘समविचारी प्रवाह, संगमनेर’ यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष, सर्वपक्षीय व समविचारी संघटना तसेच संगमनेरमधील नागरिक, विद्यार्थी सहभागी होणार आहे.
संगमनेर बस स्थानक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माळीवाड्यात या मोर्चाचा समारोप होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्याला भक्कम पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरातील सर्व नागरिक, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या मशाल मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.