मुंबई, दि. ८ मार्च
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून नंदूरबार जिल्ह्यातून १२ तारखेला ही न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. १७ मार्च रोजी या यात्रेची सांगता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेने होणार आहे. यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाने यासाठी समन्वय समित्या गठीत केल्या आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमिती सदस्य यशोमती ठाकूर, काँग्रेस कार्यसमिती सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजित कदम व प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. अमरजित मनहास यांचा समावेश आहे.

१७ मार्चला शिवाजी पार्कवर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेसाठी गठीत केलेल्या समन्वय समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत.
तर मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमिती सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी खासदार संजय निरुपम, आमदार अशोक जगताप, माजी मंत्री आ. अस्लम शेख, माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधान सभेतील उपनेते अमिन पटेल, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. अमरजित मनहास, माजी आमदार चरणजित सप्रा, माजी आमदार मधु अण्णा चव्हाण, माजी आमदार बलदेव खोसा, माजी आमदार युसुफ अब्रहानी, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हुकूमराज मेहता, दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रविकांत बावकर, उत्तर पूर्व मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अब्राहम रॉय मनी, उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस अध्यक्ष काळू बुधेलिया आणि उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष क्लाईव डायस हे सदस्य असतील.

