अहमदनगर, बुधवार दि.१७ एप्रिल
नगर जिल्हयात जुन ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्यमानातील तुट तसेच उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.
या कक्षाचा दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844 असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


