रविवार, दि.१६ जून २०२४
प्रवरेच्या विद्यार्थिनींचा शेततळ्यात बुडून झालेला मृत्यू दुर्दैवी असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिले.
तीन शालेय विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर रविवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.
मृत मुलींपैकी अनुष्का बढे आणि सृष्टी ढापसे या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यालयाच्या विद्यार्थीनी असल्याने या दुर्दैवी घटनेचे प्रवरा परीवारालाही दुःख झाले. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील घटनेच्या दिवशी दुख व्यक्त करून कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या.
शालीनी विखे पाटील यांनी मेंढवण येथे या कुटूबियांची भेट घेवून या संपूर्ण संकटात विखे पाटील परीवार तुमच्या समवेत असल्याचे सांगितले. कोणत्याही मदतीने हे नूकसान भरून येणारे नाही. तरीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून विद्यार्थ्याना असलेल्या शासकीय योजनेतून मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ, दादा गुंजाळ, रोहिदास साबळे, राहूल भोईर, नवनाथ साबळे, नवनाथ कानकाटे, गणेश वराडे, नंदू ढापसे, कारभारी बढे, भारत काळे आदी उपस्थित होते.

