बुधवार, १९ जून
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर संस्थेच्या नाशिक येथे झालेल्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलपदी संगमनेर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश विश्वनाथ कलंत्री व उद्योजक निलेश चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद प्रगती पॅनलने ९० पैकी ८५ जागांवर विजय मिळवला असून ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रकाश कलंत्री यांनी यापूर्वी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे.
कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश कलंत्री व निलेश चव्हान यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शीबोलताना सांगितले.
चव्हाण व कलंत्री यांच्या निवडीबद्दल माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे उद्योगपती राजेश मालपाणी, कृष्णकुमार बुब, अरुण शहरकर, संजय दिघे, आबासाहेब थोरात तसेच संगमनेरातील महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.



