Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जयंत पाटलांच्या पराभवाने महाविकास आघाडीत नाराजीची धग, पवारांच्या शब्दालाही उद्धव ठाकरे किंमत देत नसल्याने संताप
राजकारण

जयंत पाटलांच्या पराभवाने महाविकास आघाडीत नाराजीची धग, पवारांच्या शब्दालाही उद्धव ठाकरे किंमत देत नसल्याने संताप

नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 15, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी प्रचार केल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. म्हणून त्यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केला, असं बोललं जातं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून ज्या आमदारांचा पाठिंबा भेटण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यामध्ये हिरामण खोसकर, मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या आमदारांच्या नावांचा समावेश होता. परंतु या आमदारांची मतं फुटतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट पडले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे शेकाप उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मत देण्याच्या भूमिकेत होते. यामुळं मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईतील हॉटेल इंटर कॉन्टिनेन्टलमध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.

ठाकरे सेना जयंत पाटील यांच्या विरोधात या निवडणुकीत कट रचत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. यावरून या बैठकीत तीव्र संघर्ष बघायला भेटला. महाविकास आघाडी निवडणुकीवरून निर्माण झालेला संघर्ष शिगेला पोहोचला होता. अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, के सी पाडवी, सुरेश वरपूडकर, शिरीष चौधरी, मोहनराव हंबर्डे, हिरामण खोसकर आणि सहसराम कोरोटे हे सात जण उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या समर्थनार्थ मत देतील असा प्रस्ताव अंतिम करण्यात आला.

इतके होऊन सुद्धा ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली आणि २३ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत झगडावे लागले. काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांचा विजय झाला आणि शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्याही जिव्हारी लागला असून महाविकास आघाडीतील ही धुसफूस लवकर संपणारी नाही.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 850
महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत,…

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.