बुधवार, १४ ऑगस्ट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेर यांच्यावतीने शहरात आज बुधवारी (१४ ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता अखंड भारत संकल्प दिनानिमित्त मशाल फेरी होणार आहे.
मशाल फेरीनंतर विराट पुरोहित यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भारत मातेला पुन्हा अखंड करण्याचा संकल्प गेली अनेक वर्षे संघटना करत आहे. आपली भारतमाता स्वतंत्र झाली, पण त्याच बरोबर तिचे अनेक तुकडे होत ती खंडित होऊन स्वतंत्र झाली. ही एक खुप मोठी वेदनादायक घटना संपूर्ण भारतीय समाजमनात आहे.
यासाठी १४ ऑगस्टला सायंकाळी मशाल फेरी व विराट पुरोहित यांचे “अखंड भारत संकल्प” या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे.
मशाल फेरीची सुरुवात लाल बहादूर शास्त्री चौक येथून होणार आहे. मशाल यात्रा मार्ग – लाल बहादूर शास्त्री चौक – बाजार पेठ – तेलीखुंट – सय्यदबाबा चौक – सहस्त्रार्जुन चौक – मेनरोड कॉर्नर – वीर सावरकर मार्ग – नवीन नगर रोड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक येथे समारोप होणार आहे.


