शुक्रवार, १५ नोव्हेंबर
राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना ‘धन्यवाद साहेब’ म्हटले आहे. 
शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ शिर्डीमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना थोरात यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले होते. या अनुषंगाने थोरात यांनी पवार यांना धन्यवाद म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार… येथे कधीही आल्यानंतर एका गोष्टीची चर्चा व्हायची, निळवंडे. हे धरण व्हावं यासाठी प्रयत्न होते. येथे कधीही आल्यानंतर आम्ही काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. पण त्या कामाला अनेक वर्षे झाली गतीच येत नव्हती. आणि ज्यावेळी या कामांमध्ये बाळासाहेबांनी लक्ष घातले, त्यानंतर निळवंडेचे हे काम पूर्ण झाले. आज काही लोक सांगतात, मी केलं, मी केलं, मी केलं. मला काही त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही पण सत्य जाणून घ्यायचे असेल तर निळवंडेच काम बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच झालं.
पवार यांच्या या विधानाबद्दल नेमकं थोरात काय म्हणाले…
धन्यवाद @PawarSpeaks साहेब,
निळवंडे धरण आणि कालवे हे माझे जीवनध्येय आहे, दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्याचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. मान अपमान, वाद विवाद, श्रेय हा माझ्यासाठी गौण विषय आहे. लाभक्षेत्रात पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलतो तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. निळवंडे धरणाचे पाणी अजूनही काही भागात पोहोचवणे बाकी आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने व जनतेच्या आशीर्वादाने हे कामही आगामी काळात मी पुर्ण करेल.
धन्यवाद @PawarSpeaks साहेब,
निळवंडे धरण आणि कालवे हे माझे जीवनध्येय आहे, दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्याचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. मान अपमान, वाद विवाद, श्रेय हा माझ्यासाठी गौण विषय आहे. लाभक्षेत्रात पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलतो… pic.twitter.com/Gu4LnrGKuq
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 14, 2024

