Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच्या अटकेशिवाय मुंबई सोडू नका, सुरेश धस यांचे राज्यातील मोर्चेकरी सरपंचांना आवाहन
राजकारण

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच्या अटकेशिवाय मुंबई सोडू नका, सुरेश धस यांचे राज्यातील मोर्चेकरी सरपंचांना आवाहन

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. आका असो की आकाचा बाका, टाका असो. कोणीही असले तरी ते सर्व बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. सुरेश धस यांनी डोक्यावरुन हात फिरवत म्हटले की, यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे. यांना कोणीही भेटलं नाही पाहिजे. यांचे नातेवाईकही यांना भेटले नाही पाहिजे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज एक महिना झाला, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल नाही. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त होत आहे.

राज्यातील सरपंचांनी आझाद मैदानात परिषदेचे आयोजन करुन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. या परिषदेला भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुखची हत्या आपल्याला विसरायची नाही. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका. त्यासोबतच आमदार धस यांनी सरकारकड आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, अशी मागणी केली.

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर आष्टीचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. लातूर, पुणे येथे निघालेल्या आक्रोश मोर्चामध्येही ते सहभागी झाले. प्रत्येक मोर्चात आमदार धस यांनी बीडमधील माफियाराजचे चित्र राज्यासमोर मांडले. आज सरपंच परिषदेत सहभागी होत आमदार धस यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. आका असो की आकाचा बाका, टाका असो. कोणीही असले तरी ते सर्व बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. सुरेश धस यांनी डोक्यावरुन हात फिरवत म्हटले की, यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे. यांना कोणीही भेटलं नाही पाहिजे. यांचे नातेवाईकही यांना भेटले नाही पाहिजे. यांना कोणत्या बिनभाड्याच्या खोलीत टाकायचे याबद्दलही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. असंही आमदार सुरेश धस म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे लागेबांधे लांबपर्यंत आहेत. आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांनाही भेटता आलं नाही पाहिजे, अशीही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येला आपल्याला विसरता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपल्याला संतोष देशमुखांची हत्या लक्षात ठेवावी लागेल. वेळ लागला तरी आपल्याला लढत राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी सरपंचांना केले.

हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला सीआयडीला पुण्यात शरण आला. वाल्मिक कराड हाच हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांचा आहे. मात्र वाल्मिक कराडवर अद्याप हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडवर अवादा एनर्जी कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी प्रकरणातच त्याला अटक झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 409
बीड हत्याकांड संतोष देशमुख सुरेश धस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.