Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची हेकेखोरी कायम, जागतिक तज्ज्ञ मस्क यांना खोटं ठरवत ईव्हीएम योग्यचा दावा
महाराष्ट्र संवाद विशेष

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची हेकेखोरी कायम, जागतिक तज्ज्ञ मस्क यांना खोटं ठरवत ईव्हीएम योग्यचा दावा

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

देशातील सार्वत्रिक आणि विविध राज्यांच्या मतदानात विरोधकांनी ईव्हीएमवर घेतलेला आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निकालात काढला. जागतिक किर्तीचे तज्ज्ञ एलन मस्क यांनी केलेला ईव्हीएम हॅकिंगचा दावा मोडीत काढताना ज्या देशात ईव्हीएम वापरले जात नाहीत त्या देशातील लोकंच ईव्हीएमला दोष देत असल्याचा दावा कुमार यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव कुमार यांच्या या भूमिकेवरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विरोधकांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक होऊ शकत नाही, या आपल्या बोलण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुनरुच्चार केला. तसेच हे सांगताना अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्यावरही टीका केली.

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा आरोप हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी केले होते. त्याला उत्तर देताना आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत अविश्वसनीयता तसेच कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग तसेच, अवैध मतांचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये काही गडबड होणे शक्य नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेगवेगळ्या निर्णयांत हेच सांगत आहेत आणि आता याहून अधिक काय सांगता येईल? ईव्हीएममधील गडबडीचे आरोप निराधार आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

राजीव यांचा दावा नवी दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. राजीव कुमार यांच्या या दाव्याशी आपण अजिबात सहमत नाही. ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोग हे कसे म्हणू शकते? पूर्वीही गडबड व्हायची. आता बनावट पद्धतीने मतदान केले जाऊ शकते; त्यामुळे गडबड होत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. जर त्यांना सर्व काही योग्य वाटत असेल आणि त्यांची प्रक्रिया इतकी पारदर्शक असेल तर लोकांना शंका का येत आहेत, हा देखील एक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 595
ईव्हीएम दिल्ली विधानसभा निवडणूक निवडणूक आयोग राजीव कुमार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क…

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.