संगमनेर दि. ०५ फेब्रुवारी –
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानचा पर्यटन निधी मधून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यातील वेल्हाळे, मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थान क वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वेल्हाळे येथील श्रीक्षेत्र हरीबाबा देवस्थान, मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान आणि निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थस्थानांचा यात समावेश आहे.
या संदर्भात आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका अनेक मोठ्या विकास कामांसाठी, खांडेश्वर, निझरणेश्वर, दुधेश्वर, रामेश्वर, श्रीदत्त अकलापूर, बाळेश्वर आदी देवस्थानचा पर्यटन विकास निधीतून क वर्ग तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून विकास झाला आहे.
तालुक्यातून देवस्थानांना तालुक्यासह जिल्हाभरातून अनेक भाविक सातत्याने भेट देत असतात. चांगल्या सुविधांमुळे भाविकांची तेथे सोय होत आहे. याचप्रमाणे सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालदाड येथील श्री क्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील श्री चैतन्य महाराज देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान, निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या चार तीर्थक्षेत्रांना क दर्जा मंजूर करावा.
निळवंडे येथील डोंगरावर असलेल्या देवस्थान दत्त महाराज चैतन्य कानिफनाथ क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा योजनेतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
याचप्रमाणे वेल्हाळे येथील श्री क्षेत्र हरीबाबा देवस्थान हे प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते. तसेच मंदिर परिसर विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याने या तीर्थक्षेत्राला क वर्ग देऊन मंदिर परिसराचे सुशोभीकरण व भाविकांसाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत निधी मिळावा व या परिसराचे सुशोभीकरण व विकास करावा.
याचबरोबर मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान,खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थाना क दर्जा मिळावा व यातून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वेल्हाळे व परिसरामध्ये अनेक विकास कामांच्या योजना राबवल्या असून पुढील आठवड्यामध्ये होत असलेल्या हरीबाबा यात्रेच्या निमित्ताने हरिबाबा मंदिराचे सुशोभीकरण व क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बाबतची केलेल्या मागणीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

