



आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा भाजपचा हा फंडा आजचा नाही. याआधीही अनेक मंत्र्यांना वाचवण्यासाठी हक्कभंगाच्या अयुधांचा गैरवापर या पक्षाने केला. ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी आरोप केलेल्यांनाच कारवाईच्या धमक्या देण्यात आल्या. माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तरीही त्यांचं सदस्यत्व कायम राहू शकतं. कारण कोकाटे हे सत्तेतले मंत्री आहेत. हाच न्याय भंडाराच्या सुनील केदार यांना नाही. त्यांना कर्जवाटपाच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आलं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका दिवसात त्यांचं सदस्यत्व काढून घेतलं. केदार हे काँग्रेसचे आमदार असल्याचा हा परिणाम.

