रविवार विशेष लेख | नागपूरची सरकार पुरस्कृत दंगल…
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.


हिंदूंचं केंद्रस्थान असूनही धर्मापासून दूर झालेल्यांप्रती वैरभाव नव्हता. अपवाद १९६८ ची दंगल. हिंदू-मुस्लिम दंगलीत सारं बेचिराख होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अथक प्रयत्नाने दंगल शमली. तुकडोजी महाराज कर्करोगाने अंतरुणावर होते. त्यांनी नागपूरमधील जाणते समाजसेवक रतनभाई डागा यांच्यासह शहरातील धर्मगुरूंना मोझरीच्या आश्रमात पाचारण केलं आणि प्रार्थना सभेत त्यांनी माणुसकीचा मंत्र देताना देशाचं मोठेपण जपण्याचा संदेश दिला आणि दंगल शमली. आता एकही महाराज या भूमीत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे तेच समाजात दुहीची पेरणी करतात. तसे एकमेकाला समजून घेणारे अनेक आहेत. दुही निर्माण करणारे एखाद्या घटनेचा गैरफायदा घेत आगीत तेल ओतण्याचं काम करतात. नागपूरमध्ये हेच घडलं.
राज्य आज असंख्य संकटांचा सामना करत आहे. कसाबसा येणार्या कृषी मालावर दलालांनी केलेल्या कब्जाने शेतकरी पुरता रसातळाला गेला आहे. दररोज होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्येच्या विषय महाराष्ट्राची लाज रस्त्यावर आणत आहे. गेल्या वर्षभरात राज्यात २७०६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. यात सर्वाधिक अमरावतीचे शेतकरी आहेत. मुख्यमंत्री विदर्भातील असूनही आत्महत्या रोखल्या जात नसतील तर ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट होय. सरकार घरबसल्या महिलांना एकीकडे रमणा वाटत असताना दुसरीकडे शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं. ते पूर्ण करणं शक्य नाही, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात सरकार नाकाम ठरलंय. या आणि अशा असंख्य समस्यांच्या ओझ्यातून लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्याचा सरकारी प्रयत्न आता सहज लक्षात येतो.

