Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रमजान ईदमधून बंधुत्व आणि मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात
धार्मिक

रमजान ईदमधून बंधुत्व आणि मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, "रमजान ईद जगभरात आणि भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या काळात महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपवास हा मार्ग आहे आणि तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केला जातो."
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 31, 2025Updated:March 31, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी

“भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास, किशोर कालडा, नितीन अभंग, जीवन पंचारिया, गजेंद्र अभंग, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शकील पेंटर, शफी तांबोळी, जावेद शेख, कन्हैया कागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासामुळे जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना आनंद आणि प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीत विविधता असून, सर्वधर्म समभावामुळे आपण एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतो. हीच आपल्या देशाची ताकद आहे.

रमजान ईद जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातो आणि ती बंधुत्व, प्रेम आणि मानवतेचा संदेश देते. सर्वधर्मसमभाव आणि मानवता वाढल्याने देशाची खरी ताकद वाढेल आणि प्रगती होईल.”

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “रमजान ईद जगभरात आणि भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या काळात महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपवास हा मार्ग आहे आणि तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केला जातो.”

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “भारतात अनेक धर्म आणि पंथ आहेत आणि सांस्कृतिक विविधता ही आपली परंपरा आहे. जात, धर्म आणि पंथ वेगवेगळे असले तरी, आपण भारतीय म्हणून एकत्र येऊन सण साजरे करतो आणि हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे.”

संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव आणि इतर सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,110
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात रमजान ईद सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

By अनंत पांगारकरJune 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे:  राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन…

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.