Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

August 6, 2026

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

August 6, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिवंत सातबारा योजनेचा लाभ घ्या! वारस नोंदी सुलभ करण्याची शासनाची मोहीम – आ. अमोल खताळ यांचे आवाहन
राजकारण

जिवंत सातबारा योजनेचा लाभ घ्या! वारस नोंदी सुलभ करण्याची शासनाची मोहीम – आ. अमोल खताळ यांचे आवाहन

अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक) आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 10, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी

शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील. तसेच, वारसांना शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे जाईल आणि त्यांच्यातील मालकी हक्कासंबंधीचे वाद टळतील, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेच्या वेळापत्रकानुसार, १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठ्यांनी मृत खातेदारांची यादी तयार करून त्याचे चावडी वाचन केले आहे. आता ६ ते २० एप्रिल या कालावधीत वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी आहे. त्यानंतर २१ एप्रिल ते १० मे दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.

अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक) आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून कोणत्याही मध्यस्थ किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नयेत, असे आवाहन महसूल विभागाने केले असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या वारस नोंदी अद्ययावत कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,495
अमोल खताळ चंद्रशेखर बावनकुळे जिवंत सातबारा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

August 6, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

By अनंत पांगारकरAugust 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली…

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

August 6, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता; संगमनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

August 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.