
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी आज (बुधवार, २३ एप्रिल) दुपारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागांची सोडत काढण्यात आली. शुक्रवारी (२५ एप्रिल) प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरक्षण सोडतीनंतर कुठली ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाली यांची चर्चा सुरू होती. दरम्यान आता कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठीचे आरक्षण पडते याकडे लक्ष लागले आहे.
बुधवारी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत निहाय आरक्षण… बघा यादी





