
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे.
मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र या आदेश लागू असतील.

सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या आदेशाचा भंग करत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


