Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेचे पाणी तापले… पाईप काढण्याच्या मुद्द्यावरून तणाव! शेतकरी-अधिकारी आमनेसामने; प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर सुरू, जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
पाण्याचे राजकारण

निळवंडेचे पाणी तापले… पाईप काढण्याच्या मुद्द्यावरून तणाव! शेतकरी-अधिकारी आमनेसामने; प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर सुरू, जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 4, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप जलसंपदा विभागाने पोलीस बळाचा वापर करून काढण्यास सुरुवात केल्याने संतप्त शेतकरी संतप्त झाले असून “पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा,” अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. चाऱ्याची कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांनी कालव्यातून तात्पुरते पाणी घेण्यासाठी पाईप टाकले होते. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे पाईप तोडून टाकले. या कारवाईच्या निषेधार्थ भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी जलसंपदा विभागाने यापुढे पाईप तोडणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसांतच जलसंपदा विभागाने आपले म्हणणे फिरवत आज (रविवार ४ मे) पोलीस बळासह निमगाव बुद्रुक येथे धाव घेतली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा मोठा जमाव तिथे जमला आणि अधिकाऱ्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, राहुरी तालुक्यात कालव्याचे क्षेत्र केवळ १६ किलोमीटर असताना त्यांना २० दिवस पाणी दिले जाणार आहे. तर संगमनेर तालुक्यात ४८ किलोमीटर क्षेत्र असूनही आम्हाला फक्त २० दिवस पाणी देण्याची तयारी अधिकारी दर्शवत आहेत.
या असमान पाणी वाटपाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी संगमनेर तालुक्यातील जनतेने मोठे योगदान दिले आहे. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मदत केली. त्यामुळे या पाण्यावर पहिला हक्क असताना प्रशासनाकडून अन्याय का केला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
सध्या संगमनेर तालुक्यातील उजवा कालवा लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे. निमगाव बुद्रुक येथे इंद्रजीत थोरात यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभाग आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया___

“आमच्या हक्काचे पाणी आमच्या डोळ्यादेखत वाहून जात आहे आणि आम्ही फक्त बघायचे? आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या आणि आता हक्काचे पाणी नाकारले जात आहे. प्रशासनाने जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. गोळ्या घाला, पण आम्ही आमचे पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही.” – शिवाजी वलवे, सरपंच, मिर्झापूर

“शासनाने आमचा अंत पाहू नये. पाईपने पाणी भरणे किती कठीण आहे, हे अधिकाऱ्यांना काय माहीत? एका पाईपाला चार तास लागतात. जर आमचा हक्क डावलला गेला, तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ.” – अरुण गुंजाळ, उपसरपंच, निमज

“एकतर संगमनेर तालुक्याला नियमानुसार साठ दिवस पाणी द्या, अन्यथा पहिल्यांदा आम्हाला पाणी द्या आणि मग तुम्हाला जितके दिवस खाली पाणी द्यायचे आहे तितके द्या. राहुरी आमचे भाऊ आहेत, पण एकाला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय आम्ही सहन करणार नाही.” – सतीश खताळ, संचालक, बाजार समिती, संगमनेर.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,346
कालवे निळवंडे धरण पाणी पाण्याचा वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

April 15, 2026

निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडा; निळवंडे पाटपाणी कृती समितीची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

April 13, 2026

निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू

April 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 16, 20260

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,”…

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.