नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला.
वाढदिवस विशेष लेख | जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त…
लेखक विधीज्ञ असून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत.





त्याचा गैरफायदा उचलून संगमनेरमध्ये उभे राहत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांची बदनामी करण्याचा मोठा प्रयत्न झाला. तसेच धांदरफळ येथून डॉ. सुजय विखे यांचे सभेतून परतणाऱ्या लोकांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यानंतरही अनेक दिवस पक्षश्रेष्ठींचा संगमनेर मतदार संघ शिवसेनेला सोडायचा की भाजपाला यातच मोठा खल चालू होता. प्रस्थापित मोठ्या नेत्यांविरुद्ध अनेक वर्षे विरोधात सत्तापदापासून दूर राहिलेल्या विरोधकांकडे निवडणुकीचे शिवधनुष्य उचलणारा तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता, परंतु नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी मोठ्या नेत्याशी संघर्ष करण्यासाठी अमोलभाऊच्या रूपाने एक तरुण, स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता रणांगणात उतरवला.
तरुण, हसरा चेहरा, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मदतीला धावणारा, रस्ता केस आणि पोलिस स्टेशनला सामान्य माणसाच्या अडचणी सोडणारा नव्या उमेदीचा एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता. जसे प्रचाराचे दिवस वाढत गेले तसे लोकांत खूप लोकप्रिय बनत गेला, तरूणांनी निवडणूक हातात घेतली. मतमोजणीत मताची आघाडी घेत दहा हजारपेक्षा जास्त मते घेत महाराष्ट्रातील “जायंट किलर आमदार” म्हणून चर्चेत आले.
संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगांव पट्टयातील भोजापुर चारीचा प्रश्न असेल, निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याचे अस्तरीकरणांचा, वितारीका (चाऱ्या) काढण्यासाठीच्या निधीसाठी तसेच साकुर व पठार भागासाठी वरदान ठरणाऱ्या मोरदरा धरणाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडून लाखो शेतकऱ्यांना न्याय देऊन संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धरणासाठी सुधारित प्रस्थापित मान्यता (सु. प्र.मा.) व निधी आणण्यासाठी महाराष्ट्राचे पाटबंधारे तथा जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. काही दिवसांत संगमनेरकरांचे स्वप्नं सत्यात उतरवण्यात ते नक्कीच यशस्वी होतील. औरंगाबाद नामांतरबाबत सरकारने कठोर भूमिका घेण्याबाबत तसेच पहिल्याच दिवशी विधानसभा सभागृहाच्या पायऱ्यांवर लोकशाहीत जनता सर्वांच्च बनवते हे नतमस्तक होऊन संस्कृतीशी समरस होण्याचे उदाहरण धर्म योद्धा आ. अमोलभाऊ खताळ यांनी महाराष्ट्राला दाखवले. जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या सभागृहाचा सन्मान कसा केला गेला पाहिजे हे त्यांच्या कृतीतुन महाराष्ट्राला दिसले, अशा आमचे नेतृत्व असणाऱ्या अमोलभाऊ खताळ साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! तुमच्या यशस्वी राजकारणातील प्रवासाला आणखीन उंची मिळो. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मंत्रिपदाची जबाबदारी आपल्याला मिळो! तुमच्या नेतृत्वाखालील समाजकार्यास नवे आयाम लाभोत!