पहेलगाममध्ये बंदुकींच्या गोळ्यांचा उच्छाद मांडणार्या पाकपुरस्कृत दहशतवादाला जशास तसं तोंड देणार्या भारतीय संरक्षण दलाच्या जवानांचं सुरुवातीलाच कौतुक.. दहशतवादाचं मुळ असलेल्या पाकिस्तानच्या तळांवर सुरू असलेल्या छुमश्चक्रीने देशवासीय आनंदले नसते तर नवलच. सरकारच्या नीतीवर कोणताही संशय न घेता संरक्षण दलांनी सुरु केलेल्या या कारवाईला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका देशातील विरोधी पक्षांनी घेतल्याने सरकार म्हणून सत्ताधार्यांची जबाबदारी अधिकच वाढलीय. याचा अर्थ सैनिकांच्या नावाने स्वत:च्या छब्या नाचवणं नव्हे. वायू दलाने सियालकोटसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करत पाकिस्तानला अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. याबद्दल तिन्ही दलाचं आणि केंद्रातल्या सरकारचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र तरीही मागे वळून पाहिलं नाही तर पहेलगामसारख्या घटना घडतच राहतील. इतिहास विसरला तो वर्तमानाला तोंड देऊ शकत नाही आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करणारे भविष्य घडवू शकत नाही, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कारवाया वेळीच झाल्या असत्या तर पहेलगामसारखी घटना घडली नसती, हे मान्यच करावं लागेल. मात्र याविषयी कोणी बोलत नाही. जे बोलतात त्यांना देशद्रोहाच्या व्याख्येत बसवलं जातं. जाब विचारणार्यांच्या भूमिकेवर शंका घेतली जाते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारासारख्या घोषणा होतात. पोलिस आणि तत्सम यंत्रणांना त्याच्या मागावर लावलं जातं. यामुळे ज्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा तो टाकला जात नाही. पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. मग पुलवामा आणि पहेलगाम घडतच रहातं.
रविवार विशेष लेख — देशात बसलेल्या घरभेद्यांनाही ठेचा!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.




पाकमधील दहशतवादी तळांवर भारताकडून हल्ले झाल्यावर देशातल्या तमाम लोकांनी जवानांचं कौतुक केलं.
ही चुक एका पहेलगामपुरती मर्यादित असती तर एकवेळ
