Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भारताची पाकिस्तानला स्पष्ट शब्दात ताकीद: बेकायदेशीर कब्जा केलेला भूभाग त्वरित रिकामा करा
महाराष्ट्र संवाद विशेष

भारताची पाकिस्तानला स्पष्ट शब्दात ताकीद: बेकायदेशीर कब्जा केलेला भूभाग त्वरित रिकामा करा

7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यापासून 10 मे रोजी शस्त्रसंधीच्या निर्णयापर्यंत भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये विकसित होत असलेल्या लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा समाविष्ट नव्हता, असे स्पष्टीकरणही रणधीर जयस्वाल यांनी दिले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 13, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली: पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग त्वरित रिकामा करावा, अशी कठोर भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानला यासंदर्भात स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. याव्यतिरिक्त, सिंधू पाणी वाटप करार देखील आता स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रणधीर जयस्वाल म्हणाले की, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावरच सोडवले पाहिजेत, ही भारताची नेहमीची आणि राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.

10 मे 2025 रोजी दुपारी 3:35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून दुपारी 12:37 वाजता या संवादाची विनंती आली होती. तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला पाकिस्तानी बाजूने हॉटलाइन जोडण्यास समस्या येत होत्या. त्यानंतर भारतीय डीजीएमओंच्या उपलब्धतेनुसार दुपारी 3:35 ची वेळ निश्चित करण्यात आली.”

26/11 च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देत जयस्वाल म्हणाले, “भारताने त्यावेळीही प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्यास भारत शांत राहील. मात्र, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणे हा एक प्रलंबित आणि महत्त्वाचा मुद्दा आहे.”

पाकिस्तानकडून आलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना जयस्वाल यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “औद्योगिक स्तरावर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राने आपण या परिणामातून वाचू शकतो, असा विचार करणे हा मूर्खपणा आहे. भारताने उद्ध्वस्त केलेली दहशतवादी तळ केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगभरातील अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार होते. हे सत्य पाकिस्तानला जितक्या लवकर समजेल, तितके त्यांच्यासाठीच चांगले आहे.”

7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून 10 मे रोजी शस्त्रसंधीच्या निर्णयापर्यंत भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये विकसित होत असलेल्या लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा समाविष्ट नव्हता, असे स्पष्टीकरणही रणधीर जयस्वाल यांनी दिले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 473
परराष्ट्र मंत्रालय रणधीर जयस्वाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

By अनंत पांगारकरJune 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून…

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026

गुलाबाचे फूल अन् हाती नवे पुस्तक; अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत!

June 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.