संगमनेर, दि. १८ मे –
आजचा दिवस संगमनेरकरांसाठी अभिमानाचा, गर्वाचा आणि निष्ठेचा ठरला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी सैनिकी कारवाईस मानवंदना देण्यासाठी आज संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
संगमनेर नगरपालिकेपासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहरातील विविध मार्गावरून नवीन नगर रोडपर्यंत गेली. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारती समोर या यात्रेचा समारोप झाला. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्या देशाबद्दलचा विश्वास आणि अभिमान दिसत होता.

यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महिला, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. ही यात्रा केवळ एक औपचारिक मिरवणूक नव्हती, तर आपल्या शूर जवानांच्या शौर्याचा गौरव करणारी होती.
कुलदीप ठाकूर, श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, पायल ताजने, राहुल भोईर, शशांक नामन, विनोद सूर्यवंशी, रामभाऊ राहणे, कैलास कासार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, तरुण-तरुणी व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


