संगमनेर, प्रतिनिधी:
रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. महायुतीच्यावतीने संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवराज्याभिषेक दिन आमदार खताळ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी, आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली.
यावेळी बोलताना खताळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे रयतेच्या हितासाठी काम केले, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करून रयतेच्या भल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार झाल्यावर आपण संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती आणि उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते. त्यानुसार, संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला महायुतीचे रामभाऊ राहणे, प्रमोद राहणे, संभाजी गुंजाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, रमेश काळे, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, आरपीआयचे (आठवले गट) शहराध्यक्ष कैलास कासार, ॲड. संग्राम जोंधळे, पायल ताजणे, ज्योती भोर, दिपाली वाव्हळ, सौरभ देशमुख, शशांक नामन, राहुल भोईर, अमोल दिघे, आशिष कानवडे, ॲड. संदीप जगनर, शैलेश फटांगरे, सुशील शेवाळे, वरद बागुल, निलेश गुंजाळ, संपत गलांडे, अक्षय वर्पे, रणजीत जाधव, सार्थक शेवाळे, योगेश गुंजाळ, समर्थ कट्यारे, दिलीप खताळ, बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


