संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असल्याचे व नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम असल्यामुळे हे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या नवीन मिनी रेस्क्यू अग्निशमन (गुरखा) वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जाहागीरदार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू, शौकत जाहागीरदार, रोहित चौधरी, सौरभ देशमुख, विकास पुंड, विकास डमाळे, भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने, माजी नगरसेविका अल्पना तांबे, मेघा भगत, कांचन ढोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेर शहरातील अरुंद रस्त्यांमुळे अपघातांच्या वेळी अशा वाहनांची गरज भासते. हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल, असे सांगत विकासकामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांकडे आणि अफवांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. तसेच, केंद्रात, राज्यात व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्याने कोणालाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले.
नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीशिवाय झाली पाहिजेत, यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केल्याचे कौतुक करत, अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागणाऱ्या काही माजी नगरसेवकांवर उपाययोजना करण्याचे सक्त निर्देशही आमदार खताळ यांनी दिले.
संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नव्याने दाखल झालेल्या गुरखा अग्निशमन वाहनाचा उपयोग, त्याचे कार्यक्षेत्र आणि भविष्यातील बचावकार्यातील भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केले, तर आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले.
‘गुरखा’ अग्निशमनचे लोकार्पण: संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार: आ. खताळ
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केल्याचे कौतुक करत, अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागणाऱ्या काही माजी नगरसेवकांवर उपाययोजना करण्याचे सक्त निर्देशही आमदार खताळ यांनी दिले.



महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की,
