
संगमनेर, प्रतिनिधी:
शासकीय कामांसाठी शालेय विद्यार्थी, गावागावातील ग्रामस्थांना संगमनेर शहरात येण्याची आता गरज नाही! आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने महसूल विभागामार्फत आता मंडलनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या शिबिरांमुळे संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच उत्पन्नाचा, जातीचा, रहिवासी, नॉन-क्रिमीलेअर यांसारखे महत्त्वाचे दाखले मिळणार आहेत. याशिवाय, नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेटेशन, मतदार नोंदणी, फेरफार अर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभही या शिबिरात एकाच छताखाली उपलब्ध होईल.

वर्षभरातून दोन वेळा हे शिबिर आयोजित केले जाणार असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून या शिबिरांच्या तारखा अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाही.


