संगमनेर, प्रतिनिधी-
खरीप हंगामाच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली तरी, युरियाच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत राज्याचे माजी कृषी मंत्री आणि काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, कृषी विभागाने सोमवारी शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाला बफर स्टॉक मधील 50% युरिया तात्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत करावी, अशी भूमिका थोरात यांनी नेहमीच मांडली आहे.
थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकत म्हटले की, शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा चांगले पीक येऊनही योग्य भाव मिळत नाही. शासनाने अनेकदा हमीभाव जाहीर करण्याचे आश्वासन दिले असले तरी, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याचबरोबर, महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, ती तातडीने करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
थोरात यांनी प्रशासनाकडे आणि सरकारकडे राज्यातील तसेच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करून, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून दिला आहे. थोरात यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
बाळासाहेब थोरात: एक यशस्वी कृषी मंत्री – महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषी मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात महापिक अभियान, 1 लाख शेततळी, विद्यापीठे बांधावर यांसारखे अनेक अभिनव उपक्रम राबवले. कृषी क्षेत्रात केलेल्या या ऐतिहासिक कार्यामुळे ते महाराष्ट्रभर लोकप्रिय कृषी मंत्री म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची विनअट कर्जमाफी देण्यासाठी थोरात यांचा सर्वाधिक पुढाकार होता, असे खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश गुंजाळ यांनी सांगितले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने संगमनेरच्या शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध
थोरात यांनी प्रशासनाकडे आणि सरकारकडे राज्यातील तसेच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करून, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून दिला आहे.



बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील
थोरात यांनी प्रशासनाकडे आणि सरकारकडे
