महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीत नाही, असे ठामपणे सांगत, गरजणारे ढग बरसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती – या प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “तोंडी राम आणि बगलेत सुरी” ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसे त्यांच्या पाया पडला आणि नंतर त्याने तीन गोळ्या झाडल्या, हा इतिहास आहे. आजही भाजप गोडसेच्या विचारांना मानणाऱ्या लोकांचे समर्थन करत आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा व्यक्ती आम्ही नथुराम गोडसे होऊ असे म्हणतो, पण खरं तर ते आधीपासूनच गोडसेच्या विचारांचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा पक्षही त्याच विचारांनी प्रेरित आहे. याउलट, बाळासाहेब थोरात हे महात्मा गांधींच्या तत्त्वांवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच प्रोत्साहनाने धमक्या – भाजप अशा लोकांना का पोसते, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी करत सपकाळ यांनी भाजपला सडेतोड इशारा दिला. भाजपने असे राजकारण थांबवावे, अन्यथा आज ते विरोधकांवर ज्यांना सोडत आहेत, तेच उद्या त्यांच्या अंगावर येतील. अशा धमक्या देणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.
बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत गोडसेच्या औलादीत नाही: हर्षवर्धन सपकाळ
धमकी देणारा व्यक्ती आम्ही नथुराम गोडसे होऊ असे म्हणतो, पण खरं तर ते आधीपासूनच गोडसेच्या विचारांचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा पक्षही त्याच विचारांनी प्रेरित आहे.





तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती –
