मुंबई-
राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला.
धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मीरा भाईंदरमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या साकीनाका परिसरातही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
नांदेड, शहापूर आणि अमरावतीतही घटना- नांदेड जिल्ह्यात गाडेगाव शिवारातील आसना नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, शहापूर तालुक्यात तीन जणांचा तर अमरावतीमध्ये विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीत राज्यात १८ जणांचा मृत्यू
गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.





धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मीरा भाईंदरमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या साकीनाका परिसरातही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
