सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.
पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच बोलत राहा, महाराष्ट्राला तुमची खरी संस्कृती कळू द्या,” असे ते म्हणाले. याशिवाय खासदार निलेश लंके यांनीही पडळकरांवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या आमदारांना आवरा, अन्यथा दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दिवस जावे लागेल.” पडळकरांचे आरोप हे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खासदार निलेश लंके यांनी या मोर्चात बोलताना पडळकरांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ असल्याचा दावा केला. “आजवर कोणीही वैयक्तिक पातळीवर इतकी खालची टीका करत नव्हतं, पण सध्या राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. यावरून राज्यात जातीय दंगली सुरू झाल्या आहेत असे चित्र दिसत आहे,” असे गंभीर विधान लंके यांनी केले.
मोर्चात अनेक दिग्गज नेते सहभागी – हा निषेध मोर्चा पुष्पराज चौकातून सुरू झाला आणि राममंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापड पेठ मार्गे स्टेशन चौकात पोहोचला, जिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार निलेश लंके, धैर्यशील मोहिते, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे आणि आमदार रोहित पवार, रोहित पाटील, अभिजित पाटील, जितेंद्र आव्हाड, राजू खेर यांसारखे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. "असंच बोलत राहा, महाराष्ट्राला तुमची खरी संस्कृती कळू द्या," असे ते म्हणाले.



सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच बोलत राहा, महाराष्ट्राला तुमची खरी संस्कृती कळू द्या,” असे ते म्हणाले. याशिवाय खासदार निलेश लंके यांनीही पडळकरांवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या आमदारांना आवरा, अन्यथा दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दिवस जावे लागेल.” पडळकरांचे आरोप हे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोर्चात अनेक दिग्गज नेते सहभागी – हा निषेध मोर्चा पुष्पराज चौकातून सुरू झाला आणि राममंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापड पेठ मार्गे स्टेशन चौकात पोहोचला, जिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार निलेश लंके, धैर्यशील मोहिते, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे आणि आमदार रोहित पवार, रोहित पाटील, अभिजित पाटील, जितेंद्र आव्हाड, राजू खेर यांसारखे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.