माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती
संगमनेर – सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोक चळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी आणि सामूहिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, (2 ऑक्टोबर) होणाऱ्या या कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी होणार आहेत, तर विविध शाळांमधील 600 विद्यार्थी सामूहिक भजन सादर करून राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहतील.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गांधीजींची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या निमित्ताने, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी माहिती दिली की, गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रभात फेरीला लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होईल. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे संगमनेर बस स्थानकावर पोहोचेल. या प्रभात फेरीत सहभागी होणाऱ्या 200 विद्यार्थ्यांसह महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध चित्ररथ हे विशेष आकर्षण असणार आहेत.
सकाळी 9 वाजता प्रभात फेरी बस स्थानकावर पोहोचल्यानंतर सामूहिक भजन गायनाचा कार्यक्रम होईल. या भजन कार्यक्रमात विविध शाळांमधील 600 विद्यार्थी महात्मा गांधी यांच्या प्रार्थना गीतांचे सामूहिक गायन करून अभिवादन करतील.
या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जयहिंद लोक चळवळीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रभात फेरी व भजन कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरात 200 विद्यार्थी गांधींच्या वेशभूषेत, 600 विद्यार्थी करणार सामूहिक भजन; जयहिंद लोक चळवळीच्यावतीने भव्य प्रभात फेरीचे आयोजन…
गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रभात फेरीला लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होईल. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे संगमनेर बस स्थानकावर पोहोचेल.





भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या
या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य