अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे.
या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात गती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
अनुकंपा तत्त्वावरील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया महसूल विभागाने मागील महिन्यातच पूर्ण केली आहे. पडताळणीनंतर उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध विभाग व रिक्त जागांवर त्यांची शासकीय नोकरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच, MPSC मार्फत शिफारस केलेल्या १०९ उमेदवारांचीही संबंधित विभागांनी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि तहसीलदार (महसूल) शरद घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
अहिल्यानगरमध्ये २९० तरुणांना शासकीय नोकरी: पालकमंत्री डॉ. विखे यांच्या हस्ते ४ ऑक्टोबरला नियुक्तीपत्रे
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि तहसीलदार (महसूल) शरद घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.



अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे.
या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे.
अनुकंपा तत्त्वावरील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया महसूल विभागाने मागील महिन्यातच पूर्ण केली आहे. पडताळणीनंतर उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध विभाग व रिक्त जागांवर त्यांची शासकीय नोकरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच, MPSC मार्फत शिफारस केलेल्या १०९ उमेदवारांचीही संबंधित विभागांनी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.