संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि फादर रॉबर्ट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या नवीन वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर सुधाकर जोशी, गणपतराव सांगळे, विष्णुपंत रहाटळ, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, के. के. थोरात, शरद नाना थोरात आदींसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी गोरगरीब व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ही आश्रम शाळा सुरू केली. आज या शाळेतील ६१० हून अधिक विद्यार्थी राज्यभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आदिवासी व गरीब समाजातील पालकांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शाळेत अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध असून, नव्याने होणाऱ्या ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे, तर दर्जेदार वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची मोठी सोय होणार आहे.
माजी आमदार डॉ. तांबे यांनी यावेळी बोलताना, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद आदिवासी आश्रम शाळा गुणवत्ता आणि सुविधांच्या बाबतीत राज्यात अग्रेसर ठरली असल्याचे नमूद केले आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी शाळा यापुढेही प्रयत्नशील राहील असे सांगितले. फादर रॉबर्ट यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामीण विकासाचा मंत्र घेऊन आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. यावेळी शालेय समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सुविधा, जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
नव्याने होणाऱ्या ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे, तर दर्जेदार वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची मोठी सोय होणार आहे.



संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर सुधाकर जोशी, गणपतराव सांगळे, विष्णुपंत रहाटळ, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, के. के. थोरात, शरद नाना थोरात आदींसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार डॉ. तांबे यांनी यावेळी बोलताना, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद आदिवासी आश्रम शाळा गुणवत्ता आणि सुविधांच्या बाबतीत राज्यात अग्रेसर ठरली असल्याचे नमूद केले आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी शाळा यापुढेही प्रयत्नशील राहील असे सांगितले. फादर रॉबर्ट यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामीण विकासाचा मंत्र घेऊन आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सांगितले.