संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्या आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला आणि मुलीचा जीव वाचला.
इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती. डिग्रस गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत व कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले.
यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांच्या प्रतिकारामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.
या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या गळ्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने रक्तस्राव झाला. नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुभाष धानापुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि भक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचे निर्देश दिले.
वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून परिसर बिबटमुक्त करावा, शाळांना संरक्षण द्यावे आणि त्वरित पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा बिबट मुक्तीसाठी मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी वन विभागाला दिला आहे.
संगमनेर हादरले! शाळेत जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर बिबट्याचा हल्ला; मानेला गंभीर दुखापत, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव!
या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या गळ्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने रक्तस्राव झाला.



संगमनेर – 
इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती.
या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून,
वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर