अकोले – अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय निरागस मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कुमारी कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे देवठाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवठाण शिवारातील हिवरगाव रस्त्यावर लहानू गांगड यांचे कुटुंब राहते आणि एका शेतकऱ्याकडे ते जमीन वाट्याने कसत आहेत. मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड हे शेतात गेले होते, तर त्यांची आई घरात होती. घरातून बाहेर अंगणात कविता एकटीच खेळत असताना, सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तिला उचलून नेले.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी देवठाण परिसरात पसरताच नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली. स्थानिक नागरिक, कुटुंबातील सदस्य आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तातडीने रात्री उशिरापर्यंत कविताचा देवठाण परिसरात शोध घेतला. अखेर रात्री उशिरा देवठाण येथील हिवरगाव रस्त्याच्या परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य आणि देवठाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण शेळके यांनी या घटनेस दुजोरा दिला. गांगड कुटुंब राहत असलेल्या त्याच परिसरात कविताचा मृतदेह आढळला. रात्री उशिरा तिच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कोतुळ येथील रुग्णालयात आणले असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन महिन्यांत दुसरा बळी, ग्रामस्थांमध्ये संताप – दरम्यान, देवठाण व परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. यापूर्वी ३० मे २०२५ रोजी देवठाण गावातील काळे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून किसनाबाई रामहारी काळे (वय ५७) यांना गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान १५ जून २०२५ रोजी त्यांचे निधन झाले होते. तेव्हा वन विभागाने पिंजरे लावले होते, मात्र त्या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले होते. ही घटना ताजी असतानाच, मंगळवारी सायंकाळी पुन्हा अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तीन वर्षीय मुलीला ठार केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देवठाणमधील बिबट्याची दहशत पाहता, वनविभागाने तातडीने देवठाण आणि परिसरात अधिकाधिक पिंजरे लावून या नरभक्षक बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत; दोन महिन्यांत दुसरा बळी, वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
देवठाणमधील बिबट्याची दहशत पाहता, वनविभागाने तातडीने देवठाण आणि परिसरात अधिकाधिक पिंजरे लावून या नरभक्षक बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.



अकोले – अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय निरागस मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कुमारी कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे देवठाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी देवठाण परिसरात पसरताच नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली. स्थानिक नागरिक, कुटुंबातील सदस्य आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तातडीने रात्री उशिरापर्यंत कविताचा देवठाण परिसरात शोध घेतला. अखेर रात्री उशिरा देवठाण येथील हिवरगाव रस्त्याच्या परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दोन महिन्यांत दुसरा बळी, ग्रामस्थांमध्ये संताप – दरम्यान, देवठाण व परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. यापूर्वी ३० मे २०२५ रोजी देवठाण गावातील काळे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून किसनाबाई रामहारी काळे (वय ५७) यांना गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान १५ जून २०२५ रोजी त्यांचे निधन झाले होते. तेव्हा वन विभागाने पिंजरे लावले होते, मात्र त्या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले होते. ही घटना ताजी असतानाच, मंगळवारी सायंकाळी पुन्हा अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तीन वर्षीय मुलीला ठार केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.