अहिल्यानगर: ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना पत्र सादर करून राजीनामा दिला आहे.
फाळके यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २०१८ मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जवळपास सात वर्षांच्या काळात त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांच्यासोबत ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता.
फाळके यांनी आपला राजीनामा नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी तसेच वैयक्तिक कौटुंबिक कारणास्तव देत असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा अचानक घेतलेला निर्णय पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे.
या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या तोंडावर फाळके यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आता रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदावर पक्षाकडून कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळकेंचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
आता रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदावर पक्षाकडून कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



अहिल्यानगर: ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना पत्र सादर करून राजीनामा दिला आहे.
फाळके यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २०१८ मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जवळपास सात वर्षांच्या काळात त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांच्यासोबत ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता.
