संगमनेर – संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, निष्पाप नागरिकांना लुटून मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
शहरप्रमुख सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेरमध्ये रात्री-अपरात्री नागरिक सुरक्षित नाहीत. काही सराईत गुन्हेगार निष्पाप नागरिकांना अडवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल आणि दागिन्यांची हिसकाहिसका करतात, आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण करतात. अशा प्रकारच्या अनेक घटना पोलिसांत नोंदवलेल्या असतानाही कारवाई होत नाही.
शुक्रवारी रात्री शुभम भोईर या तरुणाला साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर राहुल सोनवणे, अनिकेत मंडलिक साई सूर्यवंशी व आणखी एकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच पार्किंग मध्ये लावलेली आपली गाडी देखील काही दिवसांपूर्वी फोडण्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा घटनांमधून संगमनेरमधील कायदा शुभवस्था बिघडू शकते त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून सदर टोळीवर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करावा.
या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी, अशा सराईत गुन्हेगारांवर तातडीने एमपीडीए (MPDA) कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. पोलिसांनी या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेनेकडून शहरात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा शहरप्रमुख सूर्यवंशी यांनी दिला.
अकोले नाका पुलाजवळ पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी – सूर्यवंशी यांनी आणखी एका निवेदनाद्वारे शहरातील व स्थानकावरील बंद पडलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची व जुना अकोले नाका येथे पुलाजवळ नव्याने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना शहरप्रमुख सूर्यवंशींचा पोलिसांना इशारा… नेमकं काय घडलं!
सूर्यवंशी यांनी आणखी एका निवेदनाद्वारे शहरातील व स्थानकावरील दंड पडलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची व जुना अकोले नाका येथे पुलाजवळ नव्याने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली आहे.




संगमनेर – 







