संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला हे १.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्यातून अत्यंत प्रभावीपणे राबवली आणि संगमनेरला स्वच्छ व सुंदर बनवले. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून विविध विकासाच्या योजना शहरात मार्गी लागल्या आहेत.
नगरपरिषदेच्या चांगल्या कामांची दखल घेऊन यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार नगर परिषदेला मिळाले आहेत. ‘माझी वसुंधरा ४.०’ योजनेतून मिळालेल्या या बक्षीस रकमेतून शहरात पर्यावरणपूरक प्रकल्प, हरितपट्टा विकास, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन यांसारखी विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.
बक्षीसातून मिळणाऱ्या निधीअंतर्गत होणारी प्रमुख कामे- वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान: हनुमान मंदिर, सावित्रीबाई फुले गार्डन, चैतन्य नगर गार्डन, गोविंद नगर, अकोले बायपास, श्रमपरिहार सोसायटी, नेहरू गार्डन, पुनर्वसन कॉलनी, राजापूर रोड, सुयोग कॉलनी, संत गाडगेबाबा गार्डन, ऑरेंज कॉर्नर, दुर्गा गार्डन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आणि अभिनव नगर या ठिकाणी वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान राबविण्यात येणार आहे.
मियावाकी प्रकल्प: कोर्टाच्या मागे, घोडेकर मळा, पुनर्वसन कॉलनी, जिजामाता रोड, पावबाकी रोड आणि इतर ठिकाणी ‘मियावाकी’ (दाट जंगल निर्मिती) प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प: कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जनजागृती अभियान: या निधीअंतर्गत पर्यावरणविषयक माहिती व जनजागृती अभियान सुद्धा शहरात राबविण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक व संवर्धनाच्या कामामुळे हे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस निधीतून शहरात इतर कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘हा बक्षिसाचा पैसा, नवा निधी नाही. ज्यांचे योगदान नाही, त्यांनी श्रेय घेऊ नये.’ – माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी राबवलेल्या ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर’ व ‘हरित संगमनेर’ या उपक्रमाला संगमनेरमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. याच माध्यमातून नगर परिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत.
व्यापारी प्रकाश कलंत्री यांनी म्हटले आहे की, ‘हा नव्याने दिलेला निधी नाही, तर ‘माझी वसुंधरा’ योजनेतील बक्षीस रक्कम आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही, अशा कोणीही या बक्षीस रकमेचे श्रेय घेऊ नये.’ या बक्षीसातून विकास कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वातील कामांना यश: ‘माझी वसुंधरा’चे संगमनेरला १.५ कोटीचे बक्षीस! आ. सत्यजीत तांबेंची माहिती, ‘हा नवा निधी नाही, ज्यांचे योगदान नाही त्यांनी श्रेय घेऊ नये’: प्रकाश कलंत्री; संगमनेरच्या बक्षीसावरून श्रेयवादाचा मुद्दा
प्रकाश कलंत्री यांनी म्हटले आहे की, 'हा नव्याने दिलेला निधी नाही, तर 'माझी वसुंधरा' योजनेतील बक्षीस रक्कम आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही, अशा कोणीही या बक्षीस रकमेचे श्रेय घेऊ नये.' या बक्षीसातून विकास कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.




संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

नगरपरिषदेच्या चांगल्या कामांची दखल घेऊन यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार नगर परिषदेला मिळाले आहेत. ‘माझी वसुंधरा ४.०’ योजनेतून मिळालेल्या या बक्षीस रकमेतून शहरात पर्यावरणपूरक प्रकल्प, हरितपट्टा विकास, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन यांसारखी विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.

मियावाकी प्रकल्प: कोर्टाच्या मागे, घोडेकर मळा, पुनर्वसन कॉलनी, जिजामाता रोड, पावबाकी रोड आणि इतर ठिकाणी ‘मियावाकी’ (दाट जंगल निर्मिती) प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक व संवर्धनाच्या कामामुळे हे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस निधीतून शहरात इतर कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.