संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गाची दुरवस्था सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी ‘विकतचे दुखणे’ ठरत आहे. टोल भरूनही खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजित तांबे यांनी महामार्गाची समस्या आणि सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रवाशांना भेडसावणारा फटका तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसांत पुण्यात किंवा मुंबईत राहणारे संगमनेरकर किंवा नाशिककर याच महामार्गाचा वापर करतात. इतकेच नव्हे, तर समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारला जाणारे लोक देखील याच महत्त्वाच्या महामार्गाने जात आहेत. मात्र, आज या महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून, टोल भरूनही प्रवाशांना खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे, यामुळे आठ ते नऊ तास वाहतूक कोंडीत फसावे लागत आहे. लोक वैतागले आणि त्रस्त झाले आहेत, तरीही घराकडे जाण्याच्या ओढीने ते हे हाल सहन करत आहेत, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी शासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, जोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल तात्काळ बंद करण्यात यावा किंवा टोलमाफी देण्यात यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प झाला असता तर आज लोकांचे हे हाल झाले नसते, हे लक्षात घेऊन नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मागील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत या महामार्गावरील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेण्यात आली होती, तसेच रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. म्हणून, आता लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांनी रस्त्यावर येऊन जनआंदोलन करावे आणि आवाज उठवावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
हा रेल्वे मार्ग झाल्यास नाशिक आणि पुण्याच्या मधल्या सर्व गावांना इतका मोठा फायदा होईल की, या संपूर्ण भागाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण पूर्णपणे बदलण्याची मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
नाशिक-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल; तात्काळ टोलमाफी द्या आणि रेल्वे प्रकल्पाला गती द्या – आ. तांबे
या संपूर्ण भागाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण पूर्णपणे बदलण्याची मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.




संगमनेर – 

दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसांत पुण्यात किंवा मुंबईत राहणारे संगमनेरकर किंवा नाशिककर याच महामार्गाचा वापर करतात.

या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी शासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

हा रेल्वे मार्ग झाल्यास नाशिक आणि पुण्याच्या