संगमनेर – निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले; मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. भोजापूर चारी कामासाठी पाठपुरावा करून या भागातील गावांकरिता सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्या असून, या योजनांवरील स्थगिती तातडीने उठवून पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी. आर. चकोर, शिवसेनेचे अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष सांगळे, अनिल कांदळकर, सखाराम शरमाळे, अनिल घुगे, सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार, अशोक मुळे, चेअरमन संतोष काळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब जगताप, ज्ञानदेव काळे, सचिव संजय गडाख, संपत शिरसाठ, रामनाथ शिरसाट, कैलास गिरी यांच्यासह ग्रामस्थ व शिवभक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कधीही भेदभाव केला नाही; सर्व जातीधर्माच्या लोकांना समान स्थान दिले. हा मानवतेचा विचार युवकांनी पुढे नेला पाहिजे. निमोण नान्नज दुमाला पंचक्रोशीतील गावांना निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी आपण उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे यासाठी मध्य प्रदेशमधील माधवपूरच्या धर्तीवर पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते. मात्र, सत्तांतरानंतर सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या लोकांना वेळीच रोखा, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आपण निधी मंजूर केला आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सहकार्यातून मोठे काम होत असून, काकडवाडीतील सोसायटीची इमारत अत्यंत सुंदर आहे.
प्रास्ताविक सरपंच जनार्दन कासार यांनी केले, सूत्रसंचालन सुनील कासार यांनी, तर सोसायटीचे चेअरमन संतोष काळे यांनी आभार मानले.
उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे यासाठी मध्य प्रदेशमधील माधवपूरच्या धर्तीवर पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते. मात्र, सत्तांतरानंतर सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या.



संगमनेर – 
थोरात म्हणाले की,
प्रास्ताविक